Saturday, May 31, 2025
Google search engine
HomeUncategorizedमी, कापडी पिशवीचाच वापर करेन ! : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ 

मी, कापडी पिशवीचाच वापर करेन ! : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ 

जागतिक पर्यावरण दिन सप्ताहांतर्गत जनजागृतीवर भर

गोंदिया : दैनंदिन जीवनशैलीत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्याचा संकल्प करीत यापुढे कापडी पिशवीचाच वापर करण्याची जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. संपूर्ण जिल्हयात 22 मे पासून 5 जून पर्यंत जागतिक पर्यावरण दिन राबविण्यात येत आहे. त्यानिमीत्ताने आज (ता.30) स्व. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात पर्यावरण तथा तंबाखूमुक्त दिनाची शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. तानाजी लोखंडे होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. फरेंद्र कुतिरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. जनार्दन खोटरे, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. कांतीलाल पटले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. सुधीर महामुनी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मा. दिलीप खोटेले यावेळी उपस्थित होते. प्लास्टीक पर्यावरणासाठी हानीकारक आहे. पर्यावरणानेे समृध्द आपली पृथ्वी आता प्लास्टिकच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे प्लास्टिक निर्मुलनासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग गरजेचा असल्याचे मत पर्यावरण दिनाची माहिती देतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी व्यक्त केले. दरम्यान लाईफ मिशन संदर्भात माहिती देवून प्रत्येक व्यक्तीने एकल वापराच्या प्लास्टीकचा वापर बंद करावा. खरेदीसाठी जातांना कापडी पिशवी घेवून जावे. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्येक कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही श्री. फरेंद्र कुतिरकर यांनी केले. तंबाखू ही जीवघेणी आहे. त्यामुळे तंबाखूचा वापर करू नये. तंबाखू खाणाऱ्यांना दंडासह सहा महिन्याच्या शिक्षेची तरतूद आहे. याची माहिती देवून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी पर्यावरण व तंबाखू मुक्त दिनाचे महत्व विशद केले. ते म्हणाले, निसर्ग आपला सखा आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडणार नाही, याची प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. केवळ शपथ घेवूनच चालणार नाही, तर प्रत्यक्षात निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येक व्यकतीने व्यक्तीश: सहभागी होण्याची गरजही त्यांनी याप्रसंगी व्यकत केली. दरम्यान स्वच्छ भारत मिशनचे माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री. अतुल गजभिये यांनी उपस्थित सर्वांना पर्यावरण संवर्धनाची तर डॉ. अनिल आटे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचे एकूण दीडशे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सीडबॉल आणि वृक्षारोपणावर भर

जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सीडबॉल तयार करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्हयात सर्वदूर सीडबॉलच्या माध्यमातून विविध प्रजांतीच्या वृक्षाची पेरणी केली जाणार आहे. यासोबतच जिल्हयात एक हजार किलोमिटरचे वृक्षारोपण सुध्दा करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी दिली. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासकीय परिसरात सुध्दा वृक्षारोपणाचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments